पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language

पर्यावरणाचे महत्व निबंध मराठी | Paryavaran Nibandh Marathi

Essay on Environment in Marathi Language: नमस्कार विदयार्थी मित्रांनो या लेखात आपण पर्यावरण निबंध मराठी / Essay on Environment in Marathi Language पाहणार आहोत. इथे आम्ही हा पर्यावरण निबंध मराठी अतिशय सध्या आणि सोप्या भाषेत दिला आहे.
Essay on Environment in Marathi Language
 

पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल, झुडपे आणि हवा हे सगळे म्हणजे पर्यावरण. थोडक्यात सांगायचे झाले तर आज सजिव सृष्टी टिकुन आहे ते पर्यावरणामुळे जर तुम्ही पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर माञ पर्यावरणाबरोबरच सजीव सृष्टीचा सुद्धा शेवट निश्चीत आहे.

पर्यावरणाचे महत्व निबंध मराठी: पर्यावरण हा सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. सजीवसृष्टीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट पर्यावरण देत असते. पर्यावरण स्वता पण जगतेच आणि सोबतच आपल्याबरोबर प्रत्येक सजीव सृष्टी मधील जीवाची ते काळजी घेत असते.
 
पर्यावरण वाचवा चळवळ

 

सजीवसृष्टीला लागणार्या प्रत्येक गोष्टीसाठी तो पर्यावरणावर अवलंबुन असतो आणि पर्यावरण निस्वार्थीपणे आपल्याला ते देत असते. हेच पर्यावरण पृथ्वीच्या निर्मीतीपासुन आजपर्यंत जगाला आणि सजीव सृष्टीला जगविण्याचे काम करत आहे. पर्यारणाकडुन आपल्याला लागणार्या हवा, पाणी ,अन्न , वस्ञ ,निवारा, विवीध साधनसंपत्ती आपल्याला मिळत असते.

पर्यावरणाची सध्यस्थिती – पण आताची पर्यावरणाची सध्यस्थिती बदलत चाललीय पुर्वीच्या काळी लोक जेवढे पर्यावरणाकडुन घेत असत त्याच्या कितीतर पटीने पर्यावरणाला देत असे. तसेच पर्यावरणाकडुन गोष्टी घेत असताना त्या तेवढ्याच प्रमाणात घेतल्या जात ज्यातुन माणसाचे जीवन सुखी होईल आणि पर्यावयणाचे संतुलन पण चांगल्या प्रकारे टिकुन राहिल. काही वर्षा पर्यंत हे ठीक ठाक चालले होते पण मध्यंतरीच्या काळात लोकसंख्येचा विस्फोट झाला.
 
भूमी प्रदूषण

 

त्यामुळे जास्त लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी लागणार्या गोष्टी पर्यावरणाकडुन कशाही आणि कोणत्याही प्रमाणात घेण्यात आल्या. पर्यावरण संतुलनाचा आणि भविष्याच विचारच केला गेला नाही. पर्यावरणाकडुन खुप मोठ्या प्रमाणात फक्त घेण्यात आले आणि त्याबदल्या सरंक्षण करणे किंवा संतलन राखणे खुपच कमी झाले. त्यामुळे पर्यावरणाचा नाश होत गेला पर्यावरण विकास होण्याएवजी अधोगतीला गेला आणि आता तो अशा परिस्थितीत आहे की लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर तो तर जाईलच सोबत पृथ्वी ला पण घेऊन जाईल.

पर्यावरण विकासाची गरज – पण म्हणतात ना राञीनंतर दिवस उगवतो तसा पर्यावरणाच्या नाशानंतर ही गोष्ट काही चांगल्या लोंकाच्या लक्षात आली त्यांना पर्यावरण विकासाची गरज लक्षात आली आणि त्यांनी पर्यावरण रक्षणाचे आंदोलन पुर्ण जगभर उभे कले. कारण त्यांना माहित होते की जर पर्यावरणाचा नाश थांबवुन त्याचा विकास नाही केला तर लवकरच सजीव सृष्टीचा नाश झाल्याशिवाय राहणाय नाही. कारण पर्यावरण जगेल तर सर्व जग जगेल.

 
environmental movements in india

 

म्हणुन आता शासकीय यंञना लोक जागे झालेत तसेच अलिकडच्या काळात सोशल मिडीयाद्वारे पण लोक पर्यावरणाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहेत आणि तसेच आपआपल्या परिसरात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करत आहेत. तसेच शासकीय यंञनेने सुद्धा सर्व शाळेत पर्यावरण विषय शिकविणी सक्तीचे केले आहे.

पर्यावरण दिन – तसेच या सगळ्या चळवळीतुन पर्यावरण दिन अस्तित्वात आला दरवर्षी ५ जुन हा पर्यावरण दिन म्हणुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्या दिवशी संपुर्ण जग पर्यावरणाचे संरक्षण करण्याची वाचवण्याची आणि विकासाची शपथ घेते. दरवर्षी 5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. खरं तर, 1972 मध्ये स्टॉकहोममध्ये संयुक्त राष्ट्रांची आमसभा झाली होती. ज्यामध्ये पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. हे दरवर्षी वेगळ्या देशाद्वारे आयोजित केले जाते. पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून देणेच हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मागच्या वर्षी 2022 मध्ये आम्ही 50 वा पर्यावरण दिन साजरा केला. भारताने यानिमित्ताने पर्यावरण चळवळीसाठी (LiFE लाइफ स्टाइल फॉर द एनवायरनमेंट) सुरू केली आहे.

 
पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

 

या पर्यावरण दिनामुळे माणसाला एक दिवस का होईना पर्यावरणाची आठवण होते. माणसाने फार काय नाही पण पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने पर्यावरण दिनाला एकच झाड जरी लावले तरी पर्यावरणाची स्थिती पुर्वीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.पर्यावरण विकासासाठी उपाय – पर्यावरण विकास करायचे ठरविले पण करायचे काय आता शासकीय यंञना त्यांचे काम करत आहेत पण आपण सुद्धा कामाला लागले पाहिजे कारण पर्यावरणाच्या नुकसानाला शासनच नाही तर आपण सुद्धा जबाबदार आहोत.

 
पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

 

म्हणुन जोमाने कामाला लाग आणि त्यासाठी करायचे एवढेच आहे दर वर्षी पर्यावरण दिनाला तुमच्या घरात जेवढी माणसे आहेत तेवढी झाडे तुमच्या आजुबाजुच्या परिसरात किंवा डोंगर रांगावर जाऊन लावायची. तसेच गडकिल्यावरपण झांडाच्या हिरव्या मशाली तयार करायच्या. जर ही गोष्ट प्रत्येक माणसाने दरवर्षी वर्षातुन एकदा जरी केली तरी पर्यावरणाचे रक्षण होईल आणि त्याचा नाश थांबुन विकास होईल.

पर्यावरणाचे किती प्रकार आहेत?

  1. नैसर्गिक पर्यावरण: हा पर्यावरणाचा तो भाग आहे जो निसर्गाने आपल्याला वरदान म्हणून दिला आहे. या मध्ये जैविक गोष्ट्टीमधे मानव, वनस्पती, प्राणी, नैसर्गिक वनस्पती इत्यादी गोष्टी येतात, तर अजैविक गोष्टींमध्ये पाणी, तापमान, हवा, तलाव, नदी, महासागर, पर्वत, तलाव, जंगल, वाळवंट, ऊर्जा, माती, आग इत्यादी गोष्टी येतात.
  2. मानवनिर्मित पर्यावरण: या प्रकारच्या पर्यावरणामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, कारखाने, वाहतुकीची साधने, जंगले, उद्यान, स्मशानभूमी, मनोरंजनाची ठिकाणे, शहरे, गावे, शेततळे, कृत्रिम तलाव, धरणे, इमारती, रस्ते, पूल, उद्याने, स्पेस स्टेशन अशा मानवनिर्मित गोष्टींचा समावेश होतो.
  3. भौतिक पर्यावरण: या वातावरणात निसर्गाने बनवलेल्या वस्तूंवर निसर्गाचे थेट नियंत्रण असते. यात कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाचा समावेश नाही. भौतिक पर्यावरणामध्ये स्थलाकृति, जलद्रव्य, हवामान, माती, खडक व खनिजे इत्यादी विषयांचाही यात अभ्यास केला जातो.
  4. जैविक पर्यावरण: मानव आणि प्राणी यांच्या मदतीने जैविक पर्यावरणाची निर्मिती झाली आहे. माणूस हा नेहमीच सामाजिक प्राणी होता आणि राहील. त्यामुळे तो शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांशी नेहमीच जोडलेला असतो. ही देखील एक प्रकारे संतुलन राखण्याची प्रक्रिया आहे. या अंतर्गत प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती मानव इत्यादींचा अभ्यास केला जातो.

10 Lines on Environment Essay in Marathi

  1. जगातील सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी स्वच्छ वातावरण असणे काळाची गरज आहे.
  2. पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांनी काही वेळोवेळी उपक्रम राबवायला पाहिजेत.
  3. पर्यावरणावर परिणाम करणारे उपक्रम कमी करण्यासाठी सरकारने धोरणे आखली पाहिजेत.
  4. रिसायकल करता येणारी उत्पादने वापरावीत. जसे कि कागदाची किव्हा कापडाची पिशवी. तसेच प्रत्येकाने इतरांनाही असेच करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
  5. प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्याचा सर्वात प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.
  6. पर्यावरणाचे महत्त्व आणि जागरूकता पसरवण्यासाठी डिजिटल मीडिया हे एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्याचा वापर केला पाहिजे.
  7. प्लॅस्टिकच्या वापराविरोधात काही कायद्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. अशा वेळी आपण आपले पर्यावरण वाचवू शकतो.
  8. तसेच, आपल्याला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
  9. सर्वांनी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे. आपण वैयक्तिक वाहनांचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे.
  10. सेंद्रिय कीटकनाशके आणि खते पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

भविष्यात आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ, सुंदर आणि सुपीक पाहायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या पर्यावरणाला वन्य प्राण्यांप्रमाणे वागवणे बंद केले पाहिजे. वातावरणात असलेल्या सर्व गोष्टींचा वापर आपण भूक लागलेल्या लांडग्यांसारखा नाही तर माणूस बनून केले पाहिजे. जेव्हा आपण पर्यावरणाला साथ देतो तेव्हा पर्यावरण आपल्याला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक साथ देईल. नैसर्गिक पर्यावरणासाठी आपल्याला जेवढी मदत हवी आहे, तेवढीच मदत निसर्ग वाचवण्यासाठीही करावी लागेल. तर मग मित्रांनो पर्यावरणावर आजच्या या लेखात दिलेला मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा.  

हे पण वाचा – 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

3 thoughts on “पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language”

Leave a Comment